Friday, May 17, 2024

आढावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार जागृती अभियानाचा

सोमवार, दिनांक १३ मे २०२४ या दिवशी छत्रपती संभाजीनगर विधानसभा क्षेत्रात  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४'साठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.  'स्वीप' अंतर्गत 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकाने  मतदार जागृती अभियान राबविले.  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील मतदान केंद्रांना दीडशे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. सरासरी आठ लाख लिटर पाणी या केंद्रांसाठी तीन दिवसांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा करण्यात आला.  महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आणि मतदान केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार महापालिकेने तयारी केली. महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या ८५० आहे. या मतदान केंद्रांसाठी शनिवारपासून टँकरने पाणी पुरवठा केला.  शनिवार, रविवार आणि सोमवारअसे तीन दिवस मतदान केंद्रांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तीन दिवसात सुमारे दीडशे टँकर्सने पाणी देण्यात आले. दीडशे टँकरच्या माध्यमातून सरासरी आठ लाख लिटर पाणी देण्यात आले. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून पाण्याबद्दल तक्रार येणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेण्यात आली होती.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आरोग्य विषयक उपाययोजना करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कळवले. त्यानुसार पालिकेचे प्रशासक श्री.  जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  सुक्ष्म नियोजन केले.  मतदानाच्या दिवशी वाढत्या उन्हाचा त्रास मतदारांना किंवा मतदानाच्या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना झाल्यास त्यांच्यावर लगेचच औषधोपचार करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी आरोग्य पथक स्थापन केले. 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला.  २३ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या.  त्यात महापालिकेच्या नऊ, १०८ च्या सहा आणि खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध करून घेतलेल्या नऊ रुग्णवाहिकांचा समावेश होता.  मतदारांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास  झाल्यास त्याला लगेचच मदत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. 

पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्षदेखील तयार करण्यात आला होता.   या कक्षात दोन खाटा, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सलाइनची व्यवस्था करण्यात आली.  मेल्ट्रॉन रुग्णालयात पन्नास खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला होता. 

पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदार संघातील मतदान केंद्रांसाठी ३११ वैद्यकीय पथके आणि २३ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वैद्यकीय पथकाकडे मेडिकल कीट देण्यात आले होते. मतदान केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना किंवा मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदृष्ट्या काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय पथकांवर नियंत्रण देण्यासाठी 'स्मार्ट सिटी' कार्यालयात कंट्रोल रुम तयार करण्यात आले होते

पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे  महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून करून  घेण्यात आली. 

अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 'स्वीप' अंतर्गत फक्त मतदान जागृती अभियान राबविले नाही; तर ते  महापालिका क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  मतदान केंद्रांवर उत्तम  नागरीसुविधांचीही व्यवस्था केली.



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...