Friday, October 11, 2024

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होतेय. या वाढत्या लोकसंख्येने शहर गजबजून गेलंय. या वाढत्या लोकसंख्येसाठी वाहतुकीची साधने कमी पडत आहेत. अशात मुंबईकरांसाठी एक सुखावह गोष्ट घडली; आणि ती ,म्हणजे मुंबई मेट्रो-३च्या पहिल्या टप्प्याच्या म्हणजेच कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइनचे  उद्घाटन.  

भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे  मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, 'एमएमआरसी'च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, प्रकल्प संचालक ए. के. गुप्ता , नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,  आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात आले. 

'' मुंबई मेट्रो - ३' ही हजारोंच्या आयुष्यातली नवी पहाट ठरणार आहे.  मुंबई मेट्रो ३ भूमिगत कॉरिडोरच्या आरे ते बीकेसी या  पहिल्या टप्प्याचे उदघाटन करत असताना आपण केवळ एक नवा वाहतुकीचा मार्ग खुला करत नसून मुंबईच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू करत आहोत . हा महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणजे मोठ्या योजना, दृष्टिकोन आणि मुंबईतल्या पायाभूत सुविधा सुधारण्याच्या प्रवाहाची फलश्रुती असून त्याला मुंबईकरांची उत्तम साथ आणि सहकार्य लाभणार आहे," असे उद्गार पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबई मेट्रो - ३ ही  मुंबई प्रवासासाठी भविष्यात कशी आणि किती फायदेशीर ठरणार आहे, त्याचा अंदाजा आला असेल. 

मुंबई मेट्रो - ३' ३३.५ कि.मी. इतकी लांब आणि २७ स्थानके असणारी मुंबई मेट्रो-३ ही मुंबईतली पूर्णतः भूमिगत असणारी पहिली मेट्रो आहे. जी  अॅक्वा लाइन म्हणूनही ओळखली जाते. पहिल्या टप्प्यात १२.४ कि.मी. अंतर व्यापले जाणार असून त्यात १० स्थानके आहेत. या टप्प्याद्वारे महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची दोन्ही टर्मिनल्स आणि वांद्रे-कुर्ला संकुल या महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्राचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो-३'मुळे ४.५ लाख प्रवाशांना सेवा देणारा हा पहिला टप्पा वाहतूक कोंडी आणि क्षमतेपेक्षा जास्त गर्दी वाहणाऱ्या लोकल ट्रेन्सवरचा बोजा कमी करेल अशी अपेक्षा आहे. या मार्गावर दर ६.४० मिनिटाला एक गाडी धावणार असून मेट्रो-३ मुळे रस्त्यावरची वाहतूक ३५ टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे दर दिवसाच्या वाहनांच्या फेऱ्या ६,६५,००० नी कमी होतील. गर्दीच्या वेळी विमानतळ आणि दक्षिण मुंबई हे अंतर कापायला लागणारा दोन तासांचा अवधी घटून ४५ मिनिटांवर येईल.

मेट्रो-३ चा सध्याच्या इतर कार्यरत वाहतूक साधनांशी उत्तमरित्या मेळ बसेल. हा टप्पा अनेक उपनगरी रेल्वेमार्ग, इतर मेट्रो लाइन्स आणि महत्त्वाच्या बसमार्गांना जोडेल. या उत्तम ताळमेळामुळे शहरातली कनेक्टिव्हिटी सुधारेल, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि शहराचे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होईल.

ॲक्वा लाइन ही भारतातल्या सर्वात जटील शहरी पायाभूत सेवा प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पामध्ये जमिनीखाली १५-३० मीटर्सवर बोगदे खणण्यासाठी १७ अत्याधुनिक टनेल बोअरिंग मशीन्स वापरण्यात आली होती. उच्च जलस्तर, कठीण पाषाण पर्यायाने स्थावर मालमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. या लाइनच्या निर्मितीमुळे हजारो रोजगार निर्माण झाले आहेतच.

मुंबई मेट्रो-३ हा एक हरित उपक्रम असून त्यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होऊन कार्बन डायऑक्साइड वार्षिक उत्सर्जन १,००,००० टनांनी कमी होणार. या बांधकामादरम्यान पर्यावरणीय मार्गदर्शन तत्त्वांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्यात आले. ज्यात पर्जन्यजल संकलन आणि ऊर्जाक्षम प्रकाशयोजनेचा समावेश आहे. या मार्गाचे उद्घाटन ही केवळ एक सुरुवात आहे. मुंबईतले मेट्रोचे जाळे अतिरिक्त लाइन्ससह आणखी विस्तारणार आहे. सर्वंकष आणि शाश्वत अशी वाहतूक यंत्रणा निर्माण करणे हे त्याचे प्रमुख ध्येय आहे.

मेट्रोच्या अनुपस्थितीत रस्त्यावरील रहदारी वाढल्यामुळे अतिरिक्त प्रवासी संख्या पूर्ण करण्यासाठी ४५० बसेसची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे. यामुळे बसप्रणालीच्या भांडवली  खर्चात २२० कोटी रुपयांची बचत होईल. मेट्रो नेटवर्कमधील विविध लाइन्सपैकी, ॲक्वा लाइन हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ही लाइन मेट्रो सिस्टिमचा कणा असून शहराच्या प्रमुख क्षेत्रांना प्रभावीपणे जोडण्यासाठी तिची रचना केली आहे.

गेल्या दोन दशकांत प्रमुख व्यावसायिक आणि रोजगार केंद्र म्हणून उदयास आलेल्या भागांमधून मेट्रो ३ चा मार्ग जातो. पूर्वी उपनगरीय रेल्वेने जोडलेले नसलेल्या या ठिकाणांना आता उच्च क्षमता, विश्वासार्ह आणि सुरक्षित वाहतूक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. गर्दीच्या वेळेस ७२,००० प्रवासी क्षमतेसह दररोज १३ लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी मेट्रो लाइन-३ शहरातली गर्दी कमी करण्यात आणि जलद, आरामदायी प्रवास प्रदान करण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.

मेट्रोचं जाळं, विशेषतः लाइन-३ हा अनेक वाहतूक समस्यांवरचा रामबाण उपाय ठरला असून प्रवाशांना एक नवीन जीवनवाहिनी मिळाली आहे. यातले आकडे बऱ्याच रंजक गोष्टी सांगतात. मेट्रो  रेल्वेमुळे वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वायू प्रदूषण कमी होऊ शकते. डीपीआरच्या अंदाजानुसार २०३१ मध्ये ८,२५६ टन आणि  २०४१ मध्ये ९,९०७ टन इतका कार्बन डाय ऑक्साइडसारख्य प्रदूषणकारी घटकात घट होईल. त्याचप्रमाणे, २०३१ मध्ये ५,२५४ याशिवाय, मेट्रो लाइन ३ च्या पर्यावरणीय फायद्यांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लोकांसाठी हा मार्ग खुला झाल्याच्या केवळ ८० दिवसांत प्रकल्पाच्या कार्बन फूटप्रिंटची भरपाई होईल. हा मार्ग अंदाजे ६.५० लाख वाहनं रस्त्यावरून काढण्यास मदत करून दररोज सुमारे ३ .५४ लाख लिटर इंधनाची बचत करेल.

मेट्रो-३ लाइन खुली होणे हा मुंबईसाठी एक नवा अध्याय असेल ज्यातूनभविष्यात सक्षम आणि आनंददायी प्रवासाची हमी मिळणार आहे. जवळच असलेली वारसास्थळे अशा आव्हानांवर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने करण्यात आलेले नियोजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. यादरम्यान सुरक्षिततेला सर्वोच्च महत्त्व देण्यातआले होते. सातत्यपूर्ण निरीक्षण आणि इमारतींच्या स्थितीचे सर्वेक्षण याचा अवलंब करण्यात आला होता. या मेट्रो लाइनमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि आर्थिक विकास तसेच शहर विकासालाही गती प्राप्त होईल.

अशी झाली मेट्रो-३ ची निर्मिती... 

लाईन-३ ही ३३.५ कि.मी. लांब आहे. हा भारतातला आत्तापर्यंतचा सर्वात लांब भूमिगत मेट्रो मार्ग आहे; ज्यामध्ये २७ स्टेशन्स आहेत, त्यापैकी २६ स्टेशन्स भूमिगत आहेत. या २६ भूमिगत स्टेशन्सपैकी १९ स्टेशन्स ही कट अँड कव्हर पद्धतीने बांधण्यात आली आहेत. 

दोन स्थानकांमधले बोगदे हे बहुतेकरून टनेलबोरिंग मशीनने (टीबीएम) खोदण्यात आले. रोलिंग स्टॉक (ट्रेन्स) आणि क्रॉस-ओव्हर कॅव्हर्न्स आणि बोगद्यांमधील क्रॉस- पॅसेजसारख्या विविध संरचनांच्या स्थिरीकरणासाठी वापण्यात आलेल्या स्टेबलिंग लाइन्सचं काम एनएटीएमने केलं आहे. भारताचे मेट्रो मॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी २०१६ मेट्रो-३ च्या टीमला हा सर्वात आवाहनात्मक शहरी प्रकल्प असल्याचे टीमला सांगून प्रकल्प उभारताना येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना दिली होती. प्रशासकीय, तांत्रिक, लॉजिस्टिक किंवा भूगर्भशास्त्रीयअशा अनेक आव्हानांसाठी डॉ. ई. श्रीधरन यांनी टीमला ताबडतोब तोडगे दिले होते. हा प्रकल्प दाट शहरी परिस्थितीत भूगर्भीय भूवैज्ञानिक आणि लॉजिस्टिक मर्यादांच्या जटिल मिश्रणात भूमिगत जागेचा वापर करण्यासाठी होता. त्याची समज आणि ज्ञान अंगीकारून परिश्रमपूर्वक काम केले.

जुन्या इमारतींचा समावेश असलेल्या गर्दीच्या शहरी भागांतून जाणारे बोगदे हा या प्रकल्पातील एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. अरुंद रस्ते आणि जागेची कमतरता यामुळे या इमारतींच्या शेजारी भूमिगत स्थानके बांधण्यात आली. यापैकी काही भागात जुन्या बाजारपेठा आणि हेरिटेज इमारती असलेली ऐतिहासिक स्थळे आहेत. खरं तर, लाइन ३ चा बराचसा भाग गर्दीच्या परिसरातून जातो. शिवाय, ही लाइन समुद्र किनाऱ्याजवळ आहे आणि मिठी नदीच्या खालून जाते. या परिसराच्या भूगर्भशास्त्रामध्ये प्रामुख्याने २-९ मीटर मातीच्या वरच्या थराखाली बेसाल्ट आहे. तसेच, समुद्रकिनाऱ्यामुळे पाण्याची पातळी उथळ आहे.

मेट्रो-३ च्या प्रत्येक स्थानकाची कथा ही एक अभियांत्रिकी पराक्रमाची गाथा आहे. एका रुळावरून दुसऱ्या रूळावर जाण्यासाठी दोन मोठ्या पोकळ्या तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी  बोगदे प्रथम टीबीएमद्वारे बांधले गेले आणि  नंतर त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं.  मेट्रोच्या सहार रोड स्टेशनजवळचे एक अंतर  २२७ मीटर लांब आहे आणि दुसरं एक सुमारे १२० मीटर आहे.

मरोळ नाका येथे लाइन ३ चा एनएटीएम प्लॅटफॉर्म थेट लाइन १ च्या खाली बांधला गेला. हे स्टेशन बांधताना त्या ठिकाणांनी अत्यंत कडक बेसाल्टचे अनेक भाग होते जे मशीनने तुटत नव्हते. त्यामुळे स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवणं आवश्यक होते. हुतात्मा चौक, काळबादेवी आणि इतर अनेक भागात हजारो मॅक्रोब्लास्ट करण्यात आले.

हुतात्मा चौक मेट्रो स्टेशन अनेक वारसा आणि जुन्या इमारतींनी वेढलेले असल्याने, हे काम अतिशय नाजूक होतं आणि व्यावसायिकांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने हाताळलं कारण त्यावरच्या इमारत रिकामी करणे शक्य नव्हतं. मुंबई हे भारतातील सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक आहे, जिथल्या रस्त्यांवर कमीत कमी जागा आणि दाट रहदारी आहे. याचं व्यवस्थापन मार्शल आणि ५.२ कि.मी. ट्रॅफिक लेनच्या मदतीने करण्यात आलं होतं ज्यात स्टील आणि काँक्रिट डेकिंगचं मिश्रण आहे.

सुरुवातीपासूनच सुरक्षेवर जोरदार अनेक प्रस्थापित बांधकाम तंत्रांचा भर देण्यात आला. तात्पुरत्या अवलंब करूनच नव्हे तर नावीन्यपूर्ण स्टेशन नियोजन, भक्कम डिझाइन तोडगे, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, नागरी सुविधांची मूळ पद्धतीने हाताळणी आणि बांधकाम साहित्य आणि कचरा व्यवस्थापन योजनांद्वारे विशाल भूमिगत जागा तयार केली गेली. आजूबाजूच्या इमारती, त्यांचे रहिवासी, शहरातले रहिवासी आणि आमचे कामगार यांची सुरक्षा आणि संरचनात्मक अखंडता आमच्यासाठी आत्यंतिक महत्त्वपूर्ण आहे.

कामांच्या मजबूत रचनांचा आग्रह तपशीलवार उपकरण आणि देखरेख हे शेजारील क्षेत्रांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानांपैकी एक होतं. समर्पित सुरक्षा संस्था, पद्धती विधानांची निर्मिती, जोखीम मूल्यमापन आणि प्रत्येक कामगारासाठी ९६ तास इंडक्शन प्रशिक्षण हे अंतर्गत आणि तृतीय पक्ष तपासणी आणि ऑडिटसोबत काही उपाय योजण्यात आले.

काही पूर्वनिर्धारित मूल्यांपासून विचलित झाल्यास आगाऊ चेतावणी मिळवण्यासाठी इन्फ्ल्यूएन्स भागातल्या  बांधकाम संरचना आणि इमारतींचं नियंत्रण आणि निरीक्षण हे आमचं सुरक्षा कवच होतं. मेट्रो-३ ला  आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्थांकडून सुरक्षा कामगिरीसाठी ४० पुरस्कार मिळाले आहेत. २०२३ मध्ये टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचा सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.

मेट्रो-३ ची निर्मिती करताना सहार क्रॉसओवरमध्ये पारंपरिक आरसीसी अस्तरांऐवजी कायमस्वरूपी अस्तरांसाठी स्टील फायबर - रिइन्फोर्स्ट स्प्रेड काँक्रिटचा वापर करण्यासह अनेक रचनात्मक नवकल्पनांचा अवलंब केला. या कामाला इंटरनॅशनल टनेलिंग असोसिएशनकडून 'बियाँड इंजिनिअरिंग ऑफ द इयर २०२३' या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला. न जीकच्या भविष्यात  मुंबईच्या इतिहासात उपनगरीय रेल्वेमार्गांच्याबरोबरीने आणखी एक महत्त्वाची जीवनवाहिनी म्हणून  मेट्रो-३ ओळखली जाईल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...