Thursday, April 25, 2024

चंद्रपूर महापालिका आणि मतदार जागृती अभियान

१९ एप्रिल २०२४  रोजी सकाळी ७  ते सायंकाळी ६ या वेळेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  'लोकसभा निवडणूक २०२४' साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदानास नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला. याचे श्रेय चंद्रपूर महानगरपालिकेला जाते.  लोकसभा निवडणूक २०२४' साठी  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रयत्न केले गेले. चंद्रपूर महानगरपालिकेनेही केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजावावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले.  यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात आली. चंद्रपूर मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. 

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 'मतदार चिठ्ठी'द्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते. तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.  चंद्रपूर महापालिकेनेही ‘मतदार चिठ्ठी’ चे  वाटप केले. या वाटपादरम्यान ज्या नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच  व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये, नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर (Epic Number ) टाकून कशी माहिती करून घेता येईल त्याविषयी जनजागृती केली.  त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation  या लिंकवर जाऊन   'मतदार चिठ्ठी'ची कशी माहिती करती येईल याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.  चंद्रपूर महानगरपालिकेने 'मतदार चिठ्ठी'च्या माहितीसाठी  18001237980 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला.  

मतदान हा आपला हक्क असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांमध्ये  याबाबत जागरूक वाढवणे आवश्यक आहे . मतदान केंद्रावर जाण्यास कंटाळा, सुटीचा दिवस,अनास्था अश्या विविध कारणांनी मतदानाचा टक्का खालावतो. मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा तर प्रयत्नरत आहेच,मात्र त्याला संस्था,आस्थापना,व्यावसायिक यांची साथ मिळाल्यास निश्चितच मतदान जनजागृती होणार आहे.  या संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रेरीत उपक्रम राबविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विपीन पालीवाल यांनी केले. .या संदर्भात शहरातील विविध आस्थापनांची बैठक १२ एप्रिल २०२४ ला चंद्रपूर महानगरपालिका  सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.  

चंद्रपूर शहरातील उपहारगृह,मॉल,चित्रपटगृह, दुकानं इत्यादी  आस्थापनांनी, मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी काही योजना राबविल्यास नागरिक मतदान करण्यास प्रोत्साहीत होऊन शहराची मतदान टक्केवारी वाढणं शक्य आहे.  शहरी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाला प्रोत्साहीत करणारे अशाप्रकारचे उपक्रम घेत  शहरातील आस्थापनांनी सहयोग करण्याचे आवाहन मा. आयुक्तांद्वारे बैठकीत करण्यात आले.

१९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील, ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९  व  २०  एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा चंद्रपूर महानगरपालिकेने केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेने  'स्वीप' अंतर्गत केलेल्या मतदार जागृती अभियानाचा फरक सकारात्मक झाला. नागरिकांचे मतदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...