Wednesday, October 25, 2023

कल्याण शहर सुंदर होणार ! पर्यावरणपूरक उपक्रम आणि सौंदर्यीकरण

हाराष्ट्रातील  ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महानगरपालिका आहेत. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, .भिवंडी निजामपूर महानगरपालिका,  उल्हासनगर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका.  आज आपण कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेविषयी माहीत करून घेणार आहोत. ऑक्टोबर महिन्यात या महापालिकेने वर्धापन दिन साजरा केला.  'क' वर्गाचे प्रतिनिधित्त्व  करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने  शहर-सौंदर्यीकरणाचे विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविले आहेत.  या उपक्रमांनी पर्यावरणाचे संतुलनही राखले गेले आहे.  तसेच कल्याण-डोंबिवली शहराची दाखल  राज्यपातळीवर घेण्यात आली आहे.  

१) रस्ता दुभाजक सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्ता रुंदीकरण झालेल्या सुमारे ४० कि.मी. लांबीच्या विविध रस्त्यांमधील दुभाजकांचे शोभिवंत झाडे लागवड करुन सुशोभिकरण करण्यात आले. सदर काम करतांना शहरातील विकासक, सामाजिक संस्था यांना विश्वासात घेऊन सुशोभिकरणाचे काम केले आहे.

त्याच बारोबर संबंधित विकासक पुढील ५ वर्षे सुशोभिकरण केलेल्या दुभाजकांची देखभाल राखणार आहेत. त्याचबरोबर सर्व रुंदिकरण झालेल्या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून सर्व रस्ते आता हिरवेगार झालेले आहेत.

२) चौक सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर चौक, वाहतुक बेटे यांची उभारणी करण्यात आली आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ होण्यासाठी विविध सामाजिक संस्था, दवाखाने, विकासक, बँका यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहभागातुन सुमारे २६

चौकांचे सुशोभिकरण व एलईडी इल्युमीनिटेड कर्व्ह स्टोन बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडलेली आहे. त्याच बरोबर वाहतुक सुरक्षितेच्या दृष्टीने वाहन चालकांना दिशा दर्शक ठरले आहे. तसेच चौकातील फसाड लाईटमुळे शहर खुलुन दिसत आहे.

३) तिरंगा लाईट 

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाचे औचित्य साधुन कल्याण पश्चिम, दुर्गाडी ते भवानी चौक (बिर्ला कॉलेज) हा ४ कि.मी. लांबीचा व सुचक नाका ते श्रीराम चौक, पुना लिंक रोड हा ४ कि.मी.लांबीच्या रस्त्याचे दुभाजकांमधील पथदिवे पोलवर आकर्षक तिरंगा रोषणाई कायमस्वरुपी करण्यात अलीआहे. त्यामाळे हे रस्ते आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरले आहेत.

४) जैव विविधता उद्यान, नागरी वनिकरण व उद्याने 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आंबिवली येथे सुमारे ५० एकर क्षेत्रावर महानगरपालिकेने एमएमआरडीए व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जैव विविधता उद्यान उभे केले आहे. या ठिकाणी जैव विविधता वाढील चालना मिळाली आहे. शहरातील शाळा व महाविद्यालये यांच्यासाठी अभ्यासाचे केंद्र ठरले आहे. या जैव विविधता उद्यानाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिम उंबर्डे येथील सुमारे १० एकर जागेवर शहर वनिकरण अंतर्गत अमृतवन उभारले आहे. या वनिकरणातुन सायकल ट्रॅक निर्माण केला असल्यामुळे शहरातील नागरीकांना पर्यावरण पुरक सायकल सफारी करता येते. महानगरपालिकेची ६५ लहान व मोठी उद्याने असून नागरीकांना या सर्व उद्यानामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

५) तलाव सुशोभिकरण 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३५ तलाव आहेत. त्यापैकी शेनाळे तलाव व टिटवाळा गणेश तलाव यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहेत. तसेच उंबर्डे तलाव व निळजे सुशोभिकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे. तसेच इतर तलावांचेसुध्दा सुशोभिकरण करण्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

६) वृक्ष संख्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० ते १५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झालेली आहे. सदर वृक्ष गणना आवश्यक असल्यामुळे चालु वर्षी अत्याधुनीक टेक्नॉलॉजी वापरुन वृक्ष गणनेचे काम सुरु आहे. शहरात सुमारे ६ लक्ष झाडे असतील असा प्राथमीक अंदाज आहे.

७) एलईडी पथदिवे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले जुने सोडीयम पथदिवे काढुन नविन ग्रीन एनर्जीयुक्त एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३८,५०६ पथदिवे असून त्यापैकी ३५,९५२ एलईडी पथदिवे बसविण्यात आल्यामुळे उर्जा बचत झाली असून पर्यावरयुक्त ग्रीन एनर्जीला महापालिकेने प्रोत्साहन दिले आहे.

८) सौर उर्जा:-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नविन इमारतींना सौर उर्जा सयंत्र बसविणे बंधनकारक केले असून सन २००७ ते २०२१ पर्यंत एकूण १८३२ इमारतींवर १ कोटी १० लक्ष क्षमतेचे सौर उष्ण सौर सयंत्रे बसविण्यात आली असून त्यामुळे प्रती वर्ष १८ कोटी २० युनीटची बचत होत आहे. सन २०२१ पासून महानगरपालिकेने नविन इमातींना सोलर रुपटॉप सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे बसविणे बंधनकारक केले असून आतापर्यंत ९९ इमारतींवर १.५४ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा सयंत्रे बसविण्यात आली असून त्यामुळे प्रती वर्षी २२ लक्ष ५४ हजार विज युनिटची निर्मिती होत आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धारणानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सौर उर्जा धोरणास चालना दिलेली आहे.

९) आकर्षक, कलात्मक भिंतीचित्रे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहराच्या सौदर्यीकरणात भर घालण्याच्या दृष्टीने शहरातील\ भिंतींवर थीम बेस पध्दतीने स्पोर्ट्स थीम, नेचर थीम, जंगल थीम, फेस्टीवल थीम आधारीत जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन शहरातील भिंतींवर आकर्षक, कलात्मक भिंतीचित्रे साकारली आहेत.

शहर सौदर्यीकरणात अशा विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवुन शहराच्या सौदर्यीकरणात मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. तसेच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागरुकता वाढीस लागली आहे. हे उपक्रम करतांना शहरातील नागरीक डोळ्या समोर ठेऊन लोक सहभागातुन हे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे आपसुकच शहरातील नागरीकांचे शहराबद्दल पूर्वी असलेले मत बदलेले असून त्यांच्या मनामध्ये शहराबद्दल आस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील सन २०२२-२३ मध्ये  घेतलेल्या शहर सौदर्यीकरण स्पर्धेमध्ये "क" वर्ग महानगरपालिका गटामध्ये शासनाचे दुसऱ्या क्रमांचे  १० कोटी  रक्कमचे बक्षीस महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...