शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून या कामांसाठी राज्य सरकारने पालिकेला निधी दिला आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील रस्त्यांचे नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने हाती घेतली असून त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील प्रमुख रस्ते आणि झोपडपट्ट्यांमधील काही भागांमध्ये शौचालयांची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. या शौचालयांच्या ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात आली असून त्याद्वारे शौचालयांमध्ये सतत पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी मलवाहिन्यांना कंटेनर शौचालयांची मलवाहिनी जोडणे शक्य आहे, त्याठिकाणी त्या जोडण्याचे काम सुरू आहे. तर ज्याठिकाणी मलवाहिनी जोडणे शक्य नाही, त्याठिकाणी मलटाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही महत्वाकांक्षी ठाण्यात कामे सुरू आहेत. या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेणे अपेक्षित असून त्यासाठी वॉर रुम तयार केली जातआहे. ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई यासह विविध नागरी कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्मयातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी करुन जाणार असून त्यांची कालमर्यादा निश्चित असल्याने दैनंदिन कामाची प्रगती पाहिली जाणार आहे,
ठाणे शहरातील १५ तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध कामे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात. याच मालिकेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत-२ योजनेतंर्गत एकूण १५ तलावांच्या संवर्धन आणि या कामांच्या निविदा अंतिम करून कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच काही तलावांच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. शहरात सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचे दृश्यरुप ठाणेकरांना अनुभवयास मिळत आहे. त्याप्रमाणेच, तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या १५ तलावांमध्ये तुर्फेपाडा, खारीगाव, हरियाली, शिवाजीनगर-कळवा, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रह्माळा, आंबे-घोसाळे, कचराळी, रायलादेवी, कमल, खिडकाळी आणि जोगिला या तलावांचा समावेश आहे. यासाठी एकूण ५३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यापैकी २५ टक्के रक्कम टक्के केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासन देणार आहे. तर, उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेचा आहे. तलावाच्या सभोवती नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, ठिकठिकाणी सुका कचरा आणि ओला कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबीन, सुरक्षा रक्षकासाठी केबीन, निर्माल्य कलश, फायबर ग्लास बोट आणि आवश्यकतेनुसार सूचना फलक लावले जातील.
यानुसार ठाणे शहराचा कायापालट होत असून टप्प्याटप्प्याने ठाणे शहर बदलतंय.
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw
LinkedIn: https://tinyurl.com/2bpdv9sv
Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x
No comments:
Post a Comment