Thursday, October 19, 2023

गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी... पिंपरी-चिंचवड शहराची स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल

शिक्षणाचे माहेरघर पुणे शहर हे पूर्वीपासून विकासाचे केंद्र होते. पुण्या शेजारील  शेजारील पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आग्रहाने 'टेल्को' प्रकल्प आणला. पाठोपाठ अनेक देशी-विदेशी उद्योग, त्यांच्यावर अवलंबून हजारो लघुउद्योगांमुळे येथे उद्योगसंस्कृती बहरली आणि हजारो हातांना रोजगार मिळाला. या कामगारांची परिसरातच निवासाची व्यवस्था करण्यासाठी १९७२ मध्ये पिंपरी-चिंचवड  प्राधिकरणाची स्थापना झाली. या भागात ४२ निवासी पेठा, चार मध्यवर्ती व्यापार केंद्रे अशा सुविधा विकसित करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत यापैकी ३२ निवासी पेठा विकसित झाल्या असून, सुमारे ११ हजार घरे उभी राहिली आहेत. याचे  श्रेय पिंपरी-चिंचवड प्राधिकरण आणि महानगर पालिकेला जाते. 

असे मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिकेविषयी लिहिण्याचे कारण काय? तर  गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी अशी ओळख असणारे पिंपरी-चिंचवड शहर ५३  वर्षांचे झाले आहे. तर महानगरपालिकेच्या स्थापनेला ११ ऑक्टोबर २०२३ ला ४१  वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या बदलत्या स्वरूपाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. 

पुणे शहरालगत वाहतूक दृष्ट्या सोयींची आणि मोकळी माळरानाची जागेची उपलब्धता पिंपरी-चिंचवड भागात होती.  परिणामी  या परिसराचा  औद्योगिक विकास होऊ लागला. त्यामुळे  कामगार, तंत्रज्ञ व इतर सेवा देणारे लोक या परिसरात येऊ लागले. त्यांच्या वास्तव्यासाठी ,परिसरात व्यवस्था करण्यासाठी, या भागातल्या गावागावात चाळींची, घरांची निर्मिती झाली. पण नागरी सुविधा पुरवणे इथल्या ग्रामपंचायतींना शक्य नव्हते, म्हणून मग इथल्या पिंपरी, चिंचवड ,आकुर्डी ,भोसरी या गावातील ग्रामपंचायती विसर्जित करून ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नवनगर पालिका अस्तित्वात आली.

नगरपालिकेच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात १९७२ मध्ये नवनगर विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. सुनियोजित शहराच्या उभारणीसाठी ४०  पेठांचे नियोजन होते. त्यापैकी बहुतांशी पेठा विकसित केल्या आहेत. त्यातील टुमदार ,सुंदर घरे, नियोजनबद्ध वसाहत, शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. तसेच शहराच्या जडणघडणीत एमआयडीसीचेही योगदान फार मोठे आहे.

नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळी ३८  चौरस किलोमीटर इतके क्षेत्र होते. त्यानंतर १९८२  मध्ये हद्दवाढ होऊन महापालिका झाली. १९९७ मध्ये पुन्हा एकदा हद्दवाढ झाली. यावेळी शहराचे क्षेत्रफळ १७१  चौरस किलोमीटर इतके झाले. शहराच्या विकासासाठी भरपूर मोठे क्षेत्र उपलब्ध झाले.  तर 

पिंपरी-चिंचवडच्या छोट्या छोट्या खेड्यांचे रुपांतर उपनगरांत झाले आहे.  उपनगरांचे रूपांतर उद्योगनगरीत झाले. उद्योगनगरी महानगर म्हणून नावारुपास आली आहे.  आणि आता तर महासागराची  वाटचाल आता स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी बरोबरच क्रीडानगरीच्या दिशेने सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा  महत्त्वाचा वाटा आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहर क्रीडानगरी म्हणून नावारूपास आले आहे. पूर्वीचे गावागावांत असलेले पहेलवानांचे आखाडे, तालमी जीवंत ठेवत क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, हॉलिबॉल, फुटबॉल, सायकलींगसह अन्य मैदानी खेळांसाठी क्रीडांगणे उभारली आहेत. यासाठी महापालिकेसह खाजगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे क्रिकेटचे मैदान उभारले आहे. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून त्याची देखभाल केली जाते. त्याला पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी नावाने ओळखले जाते. इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रकारची मैदाने येथे आहेत. अकॅडमीतील विद्यार्थ्यांना भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर स्वतः मार्गदर्शन करतात. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या संघाकडून खेळलेला सांगवीतील ऋतुराज गायकवाड हा अकॅडमीचाच विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या वयोगटानुसार अकॅडमीतर्फे ‘व्हेरॉक चषक’ स्पर्धा आयोजित करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलींनाही क्रीकेटचे धडे दिले जात आहेत. नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा मलींचा संघ खेळला.   गहुंजेतील क्रिकेट स्टेडियम, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरी, पॉलिग्रास हॉकी मैदान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची नेहरूनगर इथली क्रीडा नगरी  क्रीडाप्रबोधिनी   उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनासारख्या विविध लोकल्याणकारी योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील गृहप्रकल्पांतील सदनिका तयार झाल्या आहेत. बोर्‍हाडेवाडीचा प्रकल्प 100 टक्के तयार असून, चर्‍होलीतील 7 इमारती तयार आहेत.  सदनिकांची चावी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र  मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना १ ऑगस्ट २०२३ ला दिल्या.  शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ देण्यासाठी मनपाचे संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करीत आहेत. शहराचा सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावलीप्रमाणे कामे होत आहेत. विकासकामे पूर्ण करताना त्यातील त्रुटी कमी करुन ती दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. 

उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन झटत आहे.  राज्य शासनाने नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू  करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करा. येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्यावर विचार मंथन सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडमहानगर पालिकच्या शाळांचा  विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज इमारत, स्वच्छतागृह, ई-क्लासरुम आदी पायाभूत सुविधा उभारणी भर राहिला आहे. मनपा प्राथमिक शाळेत ई-क्लासरुम करताना वायफाय, एचडी कॅमेरे, एलईडी डिस्प्ले आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मनपा सुरुवात करणार आहे. आयटीआय’मध्ये रोजगार निमिर्तीच्या अनुषंगाने महापालिकेच्या शाळांमधून अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जाणारा आहे. नवीन शाळेची इमारत करताना त्यामध्ये मराठी माध्यमासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष प्रयत्न करणार आहे. 

प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी  पिंपरी-चिंचवड  महापालिका प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे.  प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक धोरणाप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिल जात आहे.  इलेकट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारले जात आहेत. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यापासून वीज निमिर्ती तसेच खत निर्मिती प्रकल्प उभारले जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  याचे चालते बोलते उदाहरण आहे, मोशी खत निर्मिती प्रकल्प. 

मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्टू टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात १.०७  मेगावॅट वीज तयार केली आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर २०८ कोटी३६  लाख रुपये खर्च करून उभारला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली आहे. डेपोत जमा झालेल्या ७००  टन सुक्या कचर्‍यापासून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. ती वीज प्रतियुनिट ५ रुपये दराने पालिका २० वर्षे विकत घेणार आहे. ही वीज महापालिका निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप तयार होणारी वीज वहनासाठी महावितरणांच्या यंत्रणेसोबत सुरू असेलली प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आहे. तसेच, ८१ एकर जागेतील कचरा डेपोत गेल्या २५ वर्षांत जमा झालेल्या कचर्‍याचे मोठे- मोठे डोंगर आहेत. ते काढून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. या बायोमायनिंगच्या पहिल्या टप्प्यात १४  एकर जागेतील कचरा काढण्याचे काम मार्च २०२१  ला सुरू झाले आहे. त्यासाठी ४२ कोटी खर्च करण्यात येत आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज, कोथरूड ते रामवाडी तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर अशा एकूण 54.58 किलोमीटर मार्गांवर मेट्रो ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे.  याशिवाय स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने  शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी आणि दफनभूमी निर्माण करण्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बेघर नागरिकांना पक्के घरे देण्याची कार्यवाहीवर महानगर पालिकेची संबंधीय अधिकाऱयांशी बोलणी सुरू आहेत. 

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे, वाहतूक नियंत्रण आदी सुविधा मनपामार्फत करण्यावर भर देण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मोशी येथे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने महिला बचतगटांसाठी मॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना घरपोच दाखला देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने उद्याने विकसित करण्यावर भर देण्यात आहे, 

पवना, इंद्रायणी व मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पवना बंद पाईपलाईन, भामा आसखेड प्रकल्प, २४ x ७ पाणी पुरवठा योजना, पाण्याची साठवण क्षमता, स्मार्ट शहर प्रकल्प, पुणे-निगडी विस्तारित मेट्रो मार्ग, अंतर्गत रिंगरोड, पुनवळा येथील कचरा डेपो, नाशिक फाटा-चाकण फाटा, आळंदी ते लोहगाव रस्ता, बायोगॅस आणि सौरऊर्जा प्रकल्प, कचरा प्रश्न, अण्णासाहेब मगर क्रीडांगण, कर संकलन, जलशुद्धीकरण प्रकल्प, मैला शुद्धीकरण प्रकल्प, मनपाची नवीन प्रशासकीय इमारत असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी विविध प्रकल्प जसजसे सुरू होतील,  \तसतसा शहराच्या विकासात कमालीचा  बदल  होईल. म्हणजेच शहराच्या विकासाचा आलेख आजूनवृ द्धिंगत होईल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...