Sunday, July 23, 2023

राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरूपरी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार - मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली; आणि  शासन तातडीने अॅक्शन मोडवर आले आहे. 

दुर्घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे. गुरुवारी (२० जुलै २०२३ )  दिवसभर इर्शाळवाडी येथे तळ ठोकून बसलेले राज्याचे मा. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (२१ जुलै २०२३ ) विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीत इर्शाळवाडीच्या दुर्घटनेचा आँखो देखा हाल उपस्थितांना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काथला.  आणि  एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत धोकादायक दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देत; राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 

स्थानिक माहितीनुसार  इर्शाळवाडी या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून, गावाची लोकसंख्या २२८ आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली. बचावकार्यात ९८ व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले. २२८पैकी उर्वरीत १०९ व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र या दुर्घटनेमुळे आता  इर्शाळवाडीचा समावेश राज्यातील दरडप्रवण कक्षेत्रांत करण्यात आलेला आहे. 

या दरड दुर्घटनेमुळे इरशाळवाडीतील ३० कुटुंब बेघर झालेली आहेत.  त्यांची सध्या व्यवस्था ही नानिवली गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीत करण्यात आलेली आहे.  बचाव करण्यांत आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा युक्त ६० कंटेनर्स मागविण्यात आले आहेत. त्यातील त्यातील ३० कंटेनर्स उपलब्ध झाले आहेत.  रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी प्रमाणेच आणखी आठ गावे दरडप्रवण क्षेत्रात आहेत.  गावातील लोकांनाही त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

बचावकार्य व मदत साहित्य पोहोचवण्याच्या मोहिमेला शुक्रवारी ( २१ जुलै २०२३ ) आणखी वेग आला.  बचावकार्यात यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, चौकचे ३० ग्रामस्थ, वरोसेतील २० ग्रामस्थ, खोपोली नगरपालिकेचे २५ कर्मचारी, चौक ग्राम पंचायतीचे १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप-पनवेल यांचे १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफ्टर्स आदींचा सहभाग आहे. तसेच एनडीआरएफच्या चार पथकांतील १०० जवान व टीडीआरएफचे ८० जवान, स्थानिक बचाव यंत्रणेची पाच पथके या बचावकार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावित आहेत. 

'इर्शाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके सज्ज आहे. सदर पथक  रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी- सुविधायुक्त कंटेनर, इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शोध आणि बचावकार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने डोंगराच्या पायथ्याशी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

दरड दुर्घटनेमुळे इरशाळवाडीतील ३० कुटुंब बेघर झालेली आहेत.  त्यांची सध्या व्यवस्था ही नानिवली गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीत करण्यात आलेली आहे.  बचाव करण्यांत आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा युक्त ६० कंटेनर्स मागविण्यात आले आहेत. त्यातील ३० कंटेनर्स उपलब्ध झाले आहेत.  बाकीचे कंटेनर्स लवकरच उपलब्ध होतील. तसेच नजीकच्या भविष्यात शासन इर्शाळवाडीतील रहिवाशांचे सिडकोच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करणार आहे.  रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी प्रमाणेच आणखी आठ गावे दरडप्रवण क्षेत्रात आहेत.  गावातील लोकांनाही त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. 

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाने दरड अतिप्रवण आठ  गावांतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे ठरविले आहे.  त्याचप्रमाणे  दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण भागांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य शासनाने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

सध्या रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महाड तालुक्यात सर्वाधिक गावे दरडप्रवण क्षेत्रात आहेत. या भागात पावसाचा जोरही अधिक असतो. जिल्ह्यातील काही भागांत गेल्या चार दिवसांत ५५० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. भारतीय जिओलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये आणि त्याआधी झालेल्या पाहणीत जिल्ह्यातील १०३ दरडप्रवण गावांमधील २० गावे संवेदनशील तर नऊ गावे अतिसंवेदनशील असल्याचे आढळून आले.  त्यामुळे तळीये नंतर इर्शाळवाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेमुळे आता या संवेदनशील गावांच्या परिसरातील भूगर्भीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या

नेमणुका करण्यात आल्या आहेत. दिवसभर पडणारा पाऊस, जमिनीच्या भेगा, भूगर्भातून येणारे आवाज अशा हालचालींची पाहणी करून हे अधिकारी दैनंदिन नोंद करणार आहेत व तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे  सादर करणार आहेत. यामुळे अशा दुर्घटनांची पूर्वसूचना मिळण्याची संधी मिळणार आहे व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. 

दरडग्रस्त गावांमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी हे गाव नसतानाही तिथे दरड कोसळली. यामागील कारण शोधण्यासाठी भारतीय जिओलॉजिकल सर्व्हे विभागाचे अधिकारी शुक्रवारी (२१ जुलै)  इर्शाळवाडी येथे पोहोचले. येथील भूगर्भीय हालचालींची यापूर्वी कधीच पाहणी झाली नव्हती. दोन वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील तळीये येथे दरड दुर्घटना घडली व त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडली. अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने भूवैज्ञानिक पथक या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणार आहेत. हे पथक अभ्यास नोंदी करून उपाययोजना सुचविणार आहेत.

रायगडप्रमाणे राज्यातील इतर ४८ दरडप्रवण भागांचा अभ्यास अशाच प्रकारे प्रशासन करणार आहे. यासह तिथल्या नागरिकांनाही तातडीने प्रशासन सुरक्षीत स्थळी हलवणार आहे.  कायम स्वरूपी पुनर्वसन करणार आहे. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...