Friday, March 31, 2023

भटक्या मांजरीची नसबंदी, नगर विकास विभागाचा निर्णय

राज्यातील विविध शहरांमध्ये भटक्या मांजरींचा वाढणारा उपद्रव कमी करण्यासाठी  नगरविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी आपल्या क्षेत्रात वावरणाऱ्या भटक्या मांजरींची नसबंदी करावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. नसबंदी केल्यास भटक्या मांजरींच्या संख्येवर नियंत्रण येऊन त्यांचा उपद्रव कमी होईल, अशी नगर विकास विभागाची  भूमिका आहे. शहरांतील भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी नगरविकास विभागाने त्यांची नसबंदी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शहरांत भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात येते. त्याच धर्तीवर भटक्या मांजरींची करण्यात येणार आहे. 

राज्यातील विविध शहरांमध्ये भटक्या मांजरीचा उपद्रव अलीकडे वाढला आहे. त्यातच काही प्राणीमित्र संघटना अशा भटक्या श्वान आणि मांजरींना खाऊ घालतात. त्यांच्यावर उपचार करतात. यातून भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरीची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्या संदर्भात २०२२ मध्ये सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यावर २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुनावणी झाली. त्यावेळी भटक्या श्वानांना ज्या प्रमाणे नसबंदी करून पुन्हा शहरात सोडले जाते, त्याच धर्तीवर भटक्या मांजरीही नसबंदी करून त्यांना सोडावे असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नगर विकास विभागाने हा निर्णय जाहीर केला असून शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय उपयोगी ठरणार आहे. 

मांजरींची नसबंदी करणाऱ्या संस्थेस  ठरावीक खर्च मिळणार आहे. तर मांजरींची नसबंदी करण्याविषयी काही नियमही जाहीर केले आहेत.  

  • नसबंदी करणाऱ्या संस्थेकडे तज्ज्ञ प्राण्यांचे डॉक्टर, कर्मचारी असावेत, भूलतज्ज्ञ असावेत, 
  • शस्त्रक्रियेसाठी पुरेशी जागा असावी.
  • मांजरी पकडून नसबंदी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा शहरात सोडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी संस्थेला प्राणी जन्म - नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
  • गरोदर मांजरींचा गर्भपात करू नये हेही नमूद करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...