Tuesday, August 29, 2023

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आले आहे. शहरातील पिंपरी, आकुर्डी, बोऱ्हाडेवाडी येथील घरांचे प्रकल्प किरकोळ कामे वगळता पूर्ण होऊन नागरिक राहायला येत आहेत.

बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ सदनिकांपैकी चारशेच्या जवळपास सदनिका नागरिकांना वाटप करण्यात आल्या आहेत. येथील ६०० सदनिकांना मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित सदनिकांचेही लवकरच काम पूर्ण होत आहे. किरकोळ कामे वगळता हा गृहप्रकल्प पूर्ण झाला आहे. आकुर्डी येथे ५५६, पिंपरी येथे २७० सदनिकांचे हे गृहप्रकल्प पूर्ण झालेले आहेत. बोऱ्हाडेवाडी येथील सीमा संरक्षक भिंत, प्रवेशद्वार आदी किरकोळ कामे सध्या सुरु आहेत. किरकोळ कामे वगळता तिन्ही ठिकाणचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. 



बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पाची वैशिष्ट्ये :

- एकूण इमारती (विंग) - ६

- इमारतीचे एकूण मजले - १४

- ए, बी, इ आणि एफ विंगमध्ये प्रत्येकी सदनिका - २१४

- सी आणि डी विंगमध्ये प्रत्येकी सदनिका : 216

- गृहप्रकल्पामध्ये एकूण सदनिका - १२८८

- प्रति सदनिका कार्पेट क्षेत्र : ३० चौरस मीटर

- प्रति युनिट एकूण प्रकल्प बिल्टप क्षेत्र - ५०.६३ चौरस मीटर

- प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्ट - २

- सदनिका धारकांसाठी - सांस्कृतिक भवन

- व्यापारी संकुल

- प्रकल्प एकूण खर्च - १२२.७३ कोटी रुपये

काय आहे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )? 

तप्रधान आवास योजना (नागरी) हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया (MoHUPA) द्वारे सुरू करण्यात आला. ह्या अभियानाच्या उद्दिष्टांच्या अंतर्गत, सर्वांना निवास मिळण्याची तरतूद केली जाते.  हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्ट्यांतील लोकांसाठी खाली नमूद केलेल्या योजनांच्या माध्यमातून घराच्या गरजा पूर्ण करू इच्छितेः

  • झोपडपट्टीची जमीन हा स्त्रोत वापरून खाजगी विकासकांच्या सहभागाने झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन
  • क्रेडिट लिंक्ड अनुदानाच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी परवडणा-या घरांना प्रोत्साहन.
  • सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या भागीदारीतून स्वस्त/परवडणारी घरे.
  • लाभार्थींच्या पुढाकाराने करण्यात येणारी खाजगी घरबांधणी किंवा सुधारणा यासाठी अनुदान.

लाभार्थी

हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्टीधारकांसाठी घराच्या गरजा पूर्ण करू इच्छिते. एक झोपडपट्टी म्हणजे अतिशय छोट्या परिसरात किमान ३००  लोकांचे वास्तव्य किंवा सुमारे ६०  – ७०  कुटुंबांचे आरोग्यासाठी हानीकारक आणि दाटीवाटीने अयोग्यरित्या बांधलेल्या सदनिकांमधे वास्तव्य जिथे साधारणपणे स्वच्छता आणि पिण्याचे पाणी यासारख्या पायाभूत सुविधांची उणीव असते.

लाभार्थींमधे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically weaker section - EWS) आणि अल्प उत्पन्न गट (low-income groups - LIGs) यांचा समावेश होतो. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा EWS साठी 3 लाखापर्यंत आणि LIG साठी 3-6 लाखापर्यंत आहे. EWS गटातील लाभार्थी अभियानाच्या चारही योजनांकडून मिळणा-या सहाय्यासाठी पात्र आहेत. तर LIG गट केवळ क्रेडिट लिंक्ड अनुदान योजना (Credit linked subsidy scheme - CLSS) या अभियानातील घटकाच्या अंतर्गत पात्र आहे.

या योजने अंतर्गत EWS किंवा LIG लाभार्थी म्हणून निश्चित करण्यासाठी, व्यक्तिगत कर्ज घेऊ इच्छिणारा अर्जदार उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वतःचे प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र सादर करेल.

लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी, अविवाहित मुलांचा आणि/किंवा अविवाहित मुलींचा समावेश असेल.

या अभियाना अंतर्गत केंद्रीय मदत मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी भारताच्या कुठल्याही भागात लाभार्थी कुटुंबातील त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने पक्क्या घराची मालकी असता कामा नये.

राज्य/केंद्रशासित प्रदेश, स्वतंत्र अधिकारात एक अंतिम तारीख ठरवू शकतात ज्यामधे लाभार्थी या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरण्यासाठी त्या नागरी क्षेत्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

 त्यामुळे नवीन अभियानाच्या माध्यमातून एकूण २०  दशलक्ष घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान शहरी भागांसाठी “सर्वांसाठी गृहनिर्माण” हे अभियान राबवण्यात येत आहे.

केंद्राच्या मार्गदर्शनांनुसार मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...