स्वच्छ भारत अभियानात सातत्य राखण्याच्या दृष्टीने व संपूर्ण नागरी भाग कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांकरिता, वापरलेले पाणी व मैला यांची प्रकिया, विल्हेवाट व पुनर्वापर करणे, सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे व जुना साठलेला कचरा व प्लास्टिक कचरा, बांधकाम कचरा यांची विल्हेवाट लावणे व व्यवस्थापन करणे यासाठी स्वच्छ भारत नागरी २.० चा प्रारंभ करण्यात आला आहे.
याच धर्तीवर महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.० अभियान सुरु करण्यात आले आहे.
शाश्वत घनकचरा व्यवस्थापन
- सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाच्या १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रियेसह सर्व शहरे स्वच्छ व कचरामुक्त करणे.
- घनकचरा व्यवस्थापन करताना होणारे वायू प्रदूषण कमी करणे.
- एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरात टप्प्या टप्प्याने कपात करणे.
शाश्वत स्वच्छता
या घटकाचा उद्देश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हागणदारीमुक्त दर्जा कायम ठेवणे हा आहे.
शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया
- वापरलेले पाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणे.
- भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने मानवी प्रवेश बंद करण्यात यावे.
- भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांची संपूर्ण यांत्रिकीकृत यंत्रणेद्वारे स्वच्छता करण्यात येऊन हाताने मैला हाताळण्याच्या पद्धत पूर्णतः बंद करणे.
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw
LinkedIn: https://tinyurl.com/2bpdv9sv
Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x
No comments:
Post a Comment