Friday, September 30, 2022

प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी केंद्र शासनाकडून १२, ४०९ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

कसे होणार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०)

स्वच्छ भारत अभियानात सातत्य राखण्याच्या दृष्टीने व संपूर्ण नागरी भाग कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांकरिता, वापरलेले पाणी व मैला यांची प्रकिया, विल्हेवाट व पुनर्वापर करणे, सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे व जुना साठलेला कचरा व प्लास्टिक कचरा, बांधकाम कचरा यांची विल्हेवाट लावणे व व्यवस्थापन करणे यासाठी स्वच्छ भारत नागरी २.० चा प्रारंभ करण्यात आला आहे.

याच धर्तीवर महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.० अभियान सुरु करण्यात आले आहे.

शाश्वत घनकचरा व्यवस्थापन

  • सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाच्या १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रियेसह सर्व शहरे स्वच्छ व कचरामुक्त करणे.
  • घनकचरा व्यवस्थापन करताना होणारे वायू प्रदूषण कमी करणे.
  • एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरात टप्प्या टप्प्याने कपात करणे.


शाश्वत स्वच्छता

या घटकाचा उद्देश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हागणदारीमुक्त दर्जा कायम ठेवणे हा आहे.

शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया

  • वापरलेले पाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणे.
  • भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने मानवी प्रवेश बंद करण्यात यावे.
  • भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांची संपूर्ण यांत्रिकीकृत यंत्रणेद्वारे स्वच्छता करण्यात येऊन हाताने मैला हाताळण्याच्या पद्धत पूर्णतः बंद करणे.

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...